नमस्कार… मी, गोविंद राधाकिशन पाटील वाघ बोलतो आहे… आज मला तुमच्याशी बोलायचं आहे आठ वर्षांच्या शांततेतून…” “मला तुमच्यातून निघून जाऊन आज आठ वर्षे झाली. वेळ पुढे गेला… पण माझा तुमच्यावरचा विश्वास कधीच कमी झाला नाही…” “मी जेव्हा चालत होतो, तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट होती — राजकारण हे पदासाठी नाही, तर जनतेच्या सेवेसाठी असतं.” “माझा प्रवास ज्या विचारांवर घडला, ज्या संघटनेने मला घडवलं, ती संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी कारण इथे निष्ठेला किंमत असते…” “आज मला समाधान आहे… कारण माझे भाऊ माझ्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पुढे नेण्यासाठी उभे आहेत…” “जिल्हा परिषद म्हणजे फक्त राजकारण नाही, ती आपल्या गावाच्या भविष्यासाठीची लढाई आहे. शेतकऱ्याचं पाणी, मुलांचं शिक्षण, आणि रुग्णांचं आरोग्य — हाच खरा विकास…” “मी आज तुमच्याकडे शब्दांनी विनंती करायला आलो नाही, तर आठ वर्षांच्या विश्वासाने एक गोष्ट सांगायला आलो आहे…” “जर गोविंद पाटील वाघ तुमच्यासाठी प्रामाणिक होता, तर तोच विश्वास माझ्या भावाच्या पाठीशी उभा राहू द्या…” “माझं स्वप्न अजून अपूर्ण आहे… पण ते पूर्ण करण्याची ताकद आज तुमच्या हातात आहे…” “मी आज दिसत नसलो, तरी माझा आवाजविचार कधीच मरत नाहीत…” – स्वर्गवासी गोविंद राधाकिशन पाटील वाघ 🙏 तुमच्या निर्णयात असावा…” “जय हिंद… जय महाराष्ट्र… आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव…”
