अण्णा... हे केवळ एक नाव नव्हते, तर तो कोपरगांवकरासाठी एक आधार होता. अण्णांनी आयुष्यभर माणसं जोडली आणि ती जपली. संकटात सापडलेल्या प्रत्येकाला, *"भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे"* हा अण्णांचा शब्द म्हणजे लाख मोलाचा दिलासा असायचा. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि संकटांच्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याची उमेद म्हणजेच बबनअण्णा. व्यवसायापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास नगरसेवक, ते नगराध्यक्ष असा बहरत गेला. राजकारणाच्या आखाड्यात लढतानाही त्यांनी मैत्रीचा धर्म कधीच सोडला नाही. अण्णा... हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते मैत्री निभावणारे दिलदार मित्र आणि संकटात सापडलेल्या प्रत्येकाचा आधारवड होते. आज अण्णा देहरूपाने आपल्यात नाहीत, पण त्यांनी लावलेल्या समाजसेवेच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय. कोपरगांवकरांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे, कोपरगांवकरांचे लाडके व्यक्तिमत्त्व, गोरगरिबांचे कैवारी आणि शब्दाला जागणारे दिलदार मित्र... आदरणीय माझी नगराध्यक्ष स्वर्गीय बबन अण्णा वाजे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!