अनोळखी पण आपलेच..! काल शेगांव ते नांडेड रेल्वे नी प्रवास करतांना या तिन पंजाबी पाजींची ओळख झाली. मग आमच्या मस्त गप्पा रंगल्या - बठींडा चे मग कूस्ती स्पर्धा, सिक धर्म, सध्या पंजाब ची पूर परिस्थीती आणि बरचं काही. मग त्यांनी सहज विचारलं, "आप कहा जा रहे?" मग मी त्यांना सांगितलं - "Post Graduation के लिए लातूर के Agriculture College को Admission लेने के जा रहा हूँ." मग त्यांनी म्हटलं, "Train रात को 10 बजे पहुँचेगी और Train सिर्फ नांदेड तक ही है. आगे कैसे?" मी म्हटलं - "एक तो Retiring Room करूंगा, नही तो Station पर सुबह तक रुकूंगा."_ मग ते म्हणाले - "Room वाले ज्यादा पैसे लेंगे और आप Station पर भी मत रुको. हम आज रात Gurudwara के रूम में रहेंगे, तो आप भी हमारे साथ चलो. वैसे भी यदि आप अकेले Gurudwara में जाए तो आपको रूम नहीं देंगे, इस लिए हम तीन लोगों के साथ आप भी रूम में ठहरो." मग मी त्यांना हो म्हणालो._ रात्री 10:30 ला त्यांनी मला सोबत जेवण करायला नेलं, नंतर सकाळी 5:30 ला नाश्ता करायला घेऊन गेले आणि मग मला सकाळी Bus Stand साठी सोडूनही दिलं. गुरुद्वाऱ्यातलं वातावरण इतकं शांत आणि पवित्र होतं की मन अगदी भरून आलं. त्या रात्री ते म्हणाले - "भाई, दुनिया में अच्छे लोग अभी भी हैं, बस पहचानने की देर है." मी हसलो आणि मनात म्हटलं - खरंच, माणुसकी अजून जिवंत आहे. मनाला एवढं भारी वाटलं की, एक अनोळखी व्यक्तीला किती जिव लावू शकतात! ❤️ _ त्यांनी दाखवून दिलं की धर्म, भाषा, प्रदेश काहीही असो - खरी ओळख माणुसकीचीच असते. ❤️ *त्यांचं नाव होतं-सरबजीत सिंह पाजी, जसविंदर सिंह पाजी आणि बिट्टू सिंह पाजी.* _तीन अनोळखी, पण आता कायमचे आपलेच ❤️_