कोकणात अशी अनेक गावं आहेत, जिथे आजही निसर्ग, साधेपणा आणि माणुसकी तशीच जपली गेली आहे. पण आज आपण ज्या गावात जाणार आहोत, त्या गावात फक्त सुंदर घरं, हिरवाई आणि शांत वातावरणच नाही... तर हजारो वर्षांचा इतिहासही दडलेला आहे. चला, आजची सफर करूया रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातल्या सुंदर कांटे गावाची. या प्रवासाची सुरुवात झाली वेसवी गावातून. कांटे गावात पोहोचण्यासाठी आधी आम्हाला फेरीबोटने खाडी पार करावी लागली. हा छोटासा प्रवासच कोकणाचं वेगळं सौंदर्य दाखवून गेला." "फेरीबोटमधून उतरल्यावर आम्ही कांटे गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. वाटेत हिरवीगार शेती, नांगरणी करत असलेले शेतकरी आणि पावसामुळे आणखी खुलून दिसणारा परिसर... प्रत्येक दृश्य मनात साठवून ठेवावंसं वाटत होतं.